Showing posts with label Don't worry be happy marathi natak. Show all posts
Showing posts with label Don't worry be happy marathi natak. Show all posts

Monday, 28 December 2015

Don't worry be happy



                पती-पत्नीच्या नात्यातील तणाव , त्यातून मार्ग … म्हणजे तणावातून  happy   मार्ग असे छोटेसे कथानक असले,  तरीही ती आजच्या पिढीची कथा आहे . तरुण पिढीच्या सुखाच्या कल्पना बदलल्या आहेत . चकचकित   आयुष्याचा सोस . मोठ घर , सुविधा याला प्राधान्य .  आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी मग दोघांची  होणारी धावपळ हे तर आजच्या  पिढीच दिसणार  प्रातिनिधिक चित्र. या  चित्रात तिसऱ्याला स्थान नसत . त्यासाठी होणारी धावपळ , तणाव  सोसण्याची तयारी  .

           नाटकातील नायक - नायिका अशाच तणावातून जात आहेत . दोघांच्या  वेगळ्या कामामुळे , व्यस्ततेमुळे एकमेकाकडे व्यक्त होण्यासही  फुरसत नाही .  दोघेजण आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत .त्यातून दोघे  जवळ येण्यापेक्षा गैरसमजुतीची दरीच   वाढतेय . त्यांचा मित्र दोघांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु सफल होत नाही .

         नायिकेला PCOD ( Poly-cystic Ovary    Disease ) ची समस्या आहे. या आजाराबाबत  लोकाना  जास्त  माहिती नाही .  वैद्यकीय जगातही उपचार होत असले  नेमके कारण समजू शकलेले नाही .  उपचारही नेमक निदान  होईल इतका प्रगत नाही . या आजारात स्त्रियांमध्ये हार्मोनल  बदल घडत असतात ,  तिच मासिक  पाळीच चक्र बदलत . बाळ  नैसर्गिकरित्या होण्यास समस्या उद्भवतात .  त्यातून  , सामाजिक ,कौटुंबिक  तणाव  असतो. PCOD च एक कारण कोणत्याही प्रकारचा तणावही आहे .

            बाळ  हवच या परंपरागत चौकटीचा  पगडा आपल्यावर असतो . त्यामुळे एखाद्या जोडप्यास वैद्यकीय कारणामुळे बाळ होऊ  शकत नसेल , प्रसुतीवेळी आईचा जीव धोक्यात  येऊ शकेल या गोष्टींचाही विचार  केला जात  नाही . नायिका , नायक एकमेकांमुळे आलेल्या तणावातून मुक्त होण्यासाठी काही काळ वेगळ राहण्याचा विचार करतात . त्यानंतर नायिका घटस्फोट घेण्याचा निर्णय घेते . तों निर्णय  अंमलात येतो का ?हे  नाटकात जरूर पहा . या   नाटकाने सुंदर मेसेजही दिलाय , त्याची खरोखर    आवश्यकता आहे .    आनंद  आजूबाजूलाच  असतो परंतु  आपण वरवर शोधण्यात स्वतःवरील तणाव वाढवतो . happiness comes in small   packets  हे आपणास उमजतच  नाही   कारण,   संयमाचा आणि सुखाच्या संकल्पनेचा अभाव . सुख स्वत:लाच  शोधता येईल याची  जाणीव नाटक पाहिल्यावर होते .

           स्पृहा  जोशी  यांच्या  "समुद्र " नाटकातील संयत, संवेदनशील , समजूतदार व्यक्तिरेखेपेक्षा  या नाटकातील भूमिका अवखळ , हट्टी ,मुक्त  अशी परस्परविरोधी    आहे. त्यांना विनोदाच  अंग    असल्याचही या नाटकातून जाणवलं .    "समुद्र " नाटकातील भूमिकेत एक अवघडलेपण, गुंतागुंत आहे. याउलट  या नाटकात पूर्णपणे भिन्न व्यक्तिरेखा आहे.  स्पृहा जोशी यांनी,  या भूमिकेत आवश्यक असलेली उर्जा , मुक्तपणा,अल्लडपणा   त्यांच्या नैसर्गिक अभिनयाने साकारत  प्रणोतीची  व्यक्तिरेखा जिवंत केली  आहे . उमेश कामत यांचा अभिनय उत्स्फुर्त आहे . मिहिर राजदा यांच्या व्यक्तिरेखेने धमाल आणली आहे . fresh करणार अन त्याबरोबर सामाजिक संदेश देणार सुंदर नाटक जरूर पहा .