Tuesday, 4 August 2015

श्रीमंत दामोदर पंत

            एक छोट सुखी कुटुंब . संध्याकाळी ६ नंतर मात्र त्या घरातील वातावरण पूर्णपणे  बदलत . दामुचे आजोबा म्हणजे   श्रीमंत दामोदर पंत यांचा आत्मा दामूच्या शरीरात प्रवेश करतो . दामोदर पंत हे कडक व शिस्तप्रिय व्यक्ती असतात . 

           आजोबांच्या  आत्म्याचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर    दामूच्या शांत स्वभावात जो बदल घडतो अन त्यातून  दामू (भारत जाधव) आणि त्याचे वडील यांच्यात जी जुगलबंदी सुरु होते , त्यांतून  होणारी धमाल निखळ  मनोरंजन करते . 

          आजोबांचा कडक , शिस्तप्रिय स्वभाव आणि दामूचा मुळ  शांत स्वभाव यातील बदल भारत जाधव यांनी इतक्या सहजतेने पेश केला आहे  की  , आपण त्यांच्या अभिनय कौशल्याला दाद देऊन जातो. विजय चव्हाण यांनी  दामूचे वडील म्हणून खुमासदार शैलीत या अगोदरच्या प्रयोगात काम केले होते . 

         एक निखळ , निकोप मनोरंजन . 

No comments:

Post a Comment