रस्त्यावरील खड्डे निर्जीव, असंवेदनशील ,
त्या माणूस नावाच्या प्राण्यासारखे
त्यांनाही लागतो बळी
भावना चेतवायला , पहुडलेल्या अजगरांना जागवायला
जागवायचं कसं जाणीवेने बोथट कुंभकर्णांना ,
त्यांच्या निलाजऱ्या कोषातून ,
उतरायचं कसं कातळ मनात ,
संवेदना रुजवायला , माणुसकी फुलवायला….
कधी पोचेल कृष्णविवरात आशेचा किरण?
आपणच व्हाव मार्गस्थ जपत ,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन,
आपलच कुणी गमावल्याची जाणीव होत नाही तोपर्यंत…
No comments:
Post a Comment