काहीवेळा दोन व्यक्तींच्या आयुष्यातील सूर समाजसापेक्ष दृष्टीकोनातून योग्य आलापात असले तरी , प्रत्यक्ष त्यांच्यातले सूर बिघडलेले असू शकतात . समाजाला अपेक्षित अस दिसावं म्हणून कित्येकवेळा तडजोडी केल्या जातात .
आपली आवड , ध्येय यासाठी लहानपणी पत्नी , मुल यांना सोडून गेलेला बाप , अठरा वर्षानंतर त्या बापाच्या शोधत आलेली मुलगी . बाप लहानपणी सोडून गेल्याची बोच असलेली , त्याच्या मायेला पारखी झालेली मुलगी यांच्यातला संघर्ष अशी "कार्टी काळजात घुसली " या नाटकाची थोडक्यात कथा आहे .
अनेक प्रश्न तिच्या मनात घोंगावत असतात . नाती कितीही दुरावलेली असली तरी मुल नात्यातील बंध जपण्याचा प्रयत्न करीत असतात . त्याची उत्तर तिला हवी असतात . भाबड्या आशेपोटी किवा जगाचा अनुभव नसल्यामुळे .आतापर्यंत तिला आईची बाजू माहित असते . बाबांना भेटून त्यांचीहि बाजू तिला कळते.
नायक (प्रशांत दामले) संगीताची गोडी असलेला , हास्य विनोद करणारा मोकळा माणूस … त्याची पत्नी… गृह्कर्तव्यदक्ष सांसारिक जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पडणारी. त्याचे गाणे तिला ओरडणे वाटते कलेचा आदर , स्वीकृती कुणाला नको असत . त्याला ती रुक्ष वाटते . तिच्याशी सूर जुळत नाही असे वाटते . त्यामुळे तिला सांगून तो घर सोडून जातो . पुढे संगीत दिग्दर्शक होतो . मात्र मुलीकडून त्याला तो "पळून गेलेला " अशी छाप पडलेला पती आहे अस कळत . तो तिला वस्तुस्थिती सांगतो .हे सर्व कळण्यासाठी ती मुद्दाम बेफाम, बेफिकीर मुलीचे मुलीचे नाटक करते .
विषय तसा गंभीर आहे . काही खुसखुशीत संवादातून वातावरण हलकफुलक करण्यात आल आहे. प्रशांत दामले नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत आहेत. तेजश्री प्रधान यांनी आगावू मुलीच्या भूमिकेत धमाल आणली आहे .
No comments:
Post a Comment