भूतकाळातील प्रेयसी अचानक वर्तमानात समोर आली तर …. कितीही राग असो …. काही कारणामुळे एकमेकांना सहवास मिळालेला नसो …. याबाबत गैरसमज असोत …. एक सुखद लहर शरीरातून दौडू लागते . नकळत मागच्या घटनांचा वेध घेणे सुरु होते . फार सुंदर आणि निष्पाप भावना असतात .
नायक एका वृत्तपत्रात उपसंपादक आहे . एका बिल्डर च्या निकृष्ट बांधकामामुळे तीन व्यक्तींचा बळी जातो . त्याला ती बातमी द्यावयाची अहे. ती बातमी देऊ नये म्हणून बिल्डर एका महिला अधिकाऱ्याला त्याच्याकडे पाठवतो . ती महिला अधिकारी म्हणजे त्याची गतकाळातील प्रेयसी . हळूहळू आठवणींचे धागे जसे उलगडू लागतात , तसे राग, प्रेम , जिव्हाळा, काळजी याचे तांडव सुरु होते. भूतकाळात ज्याच्या सोबत भविष्याची स्वप्ने रंगवली … नियतीने ताटातूट केली … त्याच्याच हातात भविष्यकाळ असेल तर . प्रेम , तत्व याच्या गर्तेत निर्णय घेण अवघड होत .
तिच्या दृष्टीने तिची नोकरी महत्वाची असते . घराची सर्व जबाबदारी तिच्यावर असते . त्याच्या दृष्टीने त्याची तत्व महत्वाची असतात . याची तिला जाणिव असते . यातून काही मध्यम मार्ग निघेल म्हणून ती भाबडी आशा बाळगून असते . काय होत तर . प्रेम तत्वांना तिलांजली देत? तत्व आपली मुळ घट्ट रोवून उभी राहतात ? नेमक काय होत ? प्रेम , तत्व , काळजी , जिव्हाळा याच्या विविध छटा उलगडून दाखविणाऱ्या भावाविष्कारात आपण गुंतून जातो . हा गुंता सुटतो कसा हे प्रत्यक्ष पहाणे मोहक आहे .
दिग्दर्शक -क्षितीज पटवर्धन
No comments:
Post a Comment