पती-पत्नीच्या नात्यातील तणाव , त्यातून मार्ग … म्हणजे तणावातून happy मार्ग असे छोटेसे कथानक असले, तरीही ती आजच्या पिढीची कथा आहे . तरुण पिढीच्या सुखाच्या कल्पना बदलल्या आहेत . चकचकित आयुष्याचा सोस . मोठ घर , सुविधा याला प्राधान्य . आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी मग दोघांची होणारी धावपळ हे तर आजच्या पिढीच दिसणार प्रातिनिधिक चित्र. या चित्रात तिसऱ्याला स्थान नसत . त्यासाठी होणारी धावपळ , तणाव सोसण्याची तयारी .
नाटकातील नायक - नायिका अशाच तणावातून जात आहेत . दोघांच्या वेगळ्या कामामुळे , व्यस्ततेमुळे एकमेकाकडे व्यक्त होण्यासही फुरसत नाही . दोघेजण आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत .त्यातून दोघे जवळ येण्यापेक्षा गैरसमजुतीची दरीच वाढतेय . त्यांचा मित्र दोघांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु सफल होत नाही .
नायिकेला PCOD ( Poly-cystic Ovary Disease ) ची समस्या आहे. या आजाराबाबत लोकाना जास्त माहिती नाही . वैद्यकीय जगातही उपचार होत असले नेमके कारण समजू शकलेले नाही . उपचारही नेमक निदान होईल इतका प्रगत नाही . या आजारात स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल घडत असतात , तिच मासिक पाळीच चक्र बदलत . बाळ नैसर्गिकरित्या होण्यास समस्या उद्भवतात . त्यातून , सामाजिक ,कौटुंबिक तणाव असतो. PCOD च एक कारण कोणत्याही प्रकारचा तणावही आहे .
बाळ हवच या परंपरागत चौकटीचा पगडा आपल्यावर असतो . त्यामुळे एखाद्या जोडप्यास वैद्यकीय कारणामुळे बाळ होऊ शकत नसेल , प्रसुतीवेळी आईचा जीव धोक्यात येऊ शकेल या गोष्टींचाही विचार केला जात नाही . नायिका , नायक एकमेकांमुळे आलेल्या तणावातून मुक्त होण्यासाठी काही काळ वेगळ राहण्याचा विचार करतात . त्यानंतर नायिका घटस्फोट घेण्याचा निर्णय घेते . तों निर्णय अंमलात येतो का ?हे नाटकात जरूर पहा . या नाटकाने सुंदर मेसेजही दिलाय , त्याची खरोखर आवश्यकता आहे . आनंद आजूबाजूलाच असतो परंतु आपण वरवर शोधण्यात स्वतःवरील तणाव वाढवतो . happiness comes in small packets हे आपणास उमजतच नाही कारण, संयमाचा आणि सुखाच्या संकल्पनेचा अभाव . सुख स्वत:लाच शोधता येईल याची जाणीव नाटक पाहिल्यावर होते .
स्पृहा जोशी यांच्या "समुद्र " नाटकातील संयत, संवेदनशील , समजूतदार व्यक्तिरेखेपेक्षा या नाटकातील भूमिका अवखळ , हट्टी ,मुक्त अशी परस्परविरोधी आहे. त्यांना विनोदाच अंग असल्याचही या नाटकातून जाणवलं . "समुद्र " नाटकातील भूमिकेत एक अवघडलेपण, गुंतागुंत आहे. याउलट या नाटकात पूर्णपणे भिन्न व्यक्तिरेखा आहे. स्पृहा जोशी यांनी, या भूमिकेत आवश्यक असलेली उर्जा , मुक्तपणा,अल्लडपणा त्यांच्या नैसर्गिक अभिनयाने साकारत प्रणोतीची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे . उमेश कामत यांचा अभिनय उत्स्फुर्त आहे . मिहिर राजदा यांच्या व्यक्तिरेखेने धमाल आणली आहे . fresh करणार अन त्याबरोबर सामाजिक संदेश देणार सुंदर नाटक जरूर पहा .
नाटकातील नायक - नायिका अशाच तणावातून जात आहेत . दोघांच्या वेगळ्या कामामुळे , व्यस्ततेमुळे एकमेकाकडे व्यक्त होण्यासही फुरसत नाही . दोघेजण आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत .त्यातून दोघे जवळ येण्यापेक्षा गैरसमजुतीची दरीच वाढतेय . त्यांचा मित्र दोघांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु सफल होत नाही .
नायिकेला PCOD ( Poly-cystic Ovary Disease ) ची समस्या आहे. या आजाराबाबत लोकाना जास्त माहिती नाही . वैद्यकीय जगातही उपचार होत असले नेमके कारण समजू शकलेले नाही . उपचारही नेमक निदान होईल इतका प्रगत नाही . या आजारात स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल घडत असतात , तिच मासिक पाळीच चक्र बदलत . बाळ नैसर्गिकरित्या होण्यास समस्या उद्भवतात . त्यातून , सामाजिक ,कौटुंबिक तणाव असतो. PCOD च एक कारण कोणत्याही प्रकारचा तणावही आहे .
बाळ हवच या परंपरागत चौकटीचा पगडा आपल्यावर असतो . त्यामुळे एखाद्या जोडप्यास वैद्यकीय कारणामुळे बाळ होऊ शकत नसेल , प्रसुतीवेळी आईचा जीव धोक्यात येऊ शकेल या गोष्टींचाही विचार केला जात नाही . नायिका , नायक एकमेकांमुळे आलेल्या तणावातून मुक्त होण्यासाठी काही काळ वेगळ राहण्याचा विचार करतात . त्यानंतर नायिका घटस्फोट घेण्याचा निर्णय घेते . तों निर्णय अंमलात येतो का ?हे नाटकात जरूर पहा . या नाटकाने सुंदर मेसेजही दिलाय , त्याची खरोखर आवश्यकता आहे . आनंद आजूबाजूलाच असतो परंतु आपण वरवर शोधण्यात स्वतःवरील तणाव वाढवतो . happiness comes in small packets हे आपणास उमजतच नाही कारण, संयमाचा आणि सुखाच्या संकल्पनेचा अभाव . सुख स्वत:लाच शोधता येईल याची जाणीव नाटक पाहिल्यावर होते .
स्पृहा जोशी यांच्या "समुद्र " नाटकातील संयत, संवेदनशील , समजूतदार व्यक्तिरेखेपेक्षा या नाटकातील भूमिका अवखळ , हट्टी ,मुक्त अशी परस्परविरोधी आहे. त्यांना विनोदाच अंग असल्याचही या नाटकातून जाणवलं . "समुद्र " नाटकातील भूमिकेत एक अवघडलेपण, गुंतागुंत आहे. याउलट या नाटकात पूर्णपणे भिन्न व्यक्तिरेखा आहे. स्पृहा जोशी यांनी, या भूमिकेत आवश्यक असलेली उर्जा , मुक्तपणा,अल्लडपणा त्यांच्या नैसर्गिक अभिनयाने साकारत प्रणोतीची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे . उमेश कामत यांचा अभिनय उत्स्फुर्त आहे . मिहिर राजदा यांच्या व्यक्तिरेखेने धमाल आणली आहे . fresh करणार अन त्याबरोबर सामाजिक संदेश देणार सुंदर नाटक जरूर पहा .
No comments:
Post a Comment