Tuesday, 16 February 2016

अ फेअर डील

               


           कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
. अर्थात फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहा . यात एक कर्म अपेक्षित आहे की , अनेक ? जर अनेक कर्मे अपेक्षित असतील तर प्राधान्य कशाला द्यायचं ?याची उकल प्रत्यक्ष आयुष्यात होऊ शकली नाही , तर त्यातून भावनिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते .करिअर आणि पत्नी यात प्राधान्य कशाला द्यायचं ? करिअर मध्ये गुंतलात तर पत्नीच्या भावनिक विश्वात पोकळी निर्माण होऊ शकते . पत्नीमध्ये गुंतलात तर करिअर वर परिणाम होऊ शकतो . एक व्यावसायिक गरज तर एक भावनिक .भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ म्हटलं तर सामान्य माणसाच्या आयुष्यात उलथापालथ झालीच म्हणून समजा .
                मंदार आणि देवयानी या जोडप्याची ही कहाणी आहे . सुरवातीचा काळ हा वेडेपणाने भारलेला काळ असतो . म्हणजे मंदारच्या म्हणण्याप्रमाणे ज्या काळात बायकोचे ढेकरही सुंदर वाटतात तो काळ . रोमान्स नसानसात भिनलेला अन रक्तातून सळसळत वाहत असतो . आपल्या जोडीदाराचे लक्ष वेधण्यासाठी प्रियकर गुंतलेला असतो . या प्रेमाच्या विश्वात दोघेही गुंतून गेलेले असतात . तेच त्यांचे छोट विश्व असतं . त्याच सतत तिला जपण , तिच्याकडे लक्ष देण  तिला मोहवत असत . ती त्याची ठकी असते , तो तिचा गुरु असतो . मग काळ सरायला लागतो . वास्तवतेचे भान येऊ लागते . काळाच्या ओघात प्रणयाचा गडद पडदा विरळ होऊ लागतो . संसार चालवण्यासाठी करिअरही आवश्यक असते . केवळ प्रेमावर जगता येत नाही , याच भान येऊ लागत . त्यातून पत्नीच्या जीवनात एक रितेपण येऊ लागत . ती भूतकाळातील गुरु , ठकी वर्तमानकाळात शोधू लागते . रोमांटिक गुरूची कल्पना करून आपली भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी त्याला मध्यवर्ती कल्पून ती डायरी लिहू लागते . अर्थात हा असतो कल्पना विलास .  डायरी तिच्या मुलीच्या हाती लागते अन तिच भावनिक विश्व हादरत . आई वरील प्रेमच रुपांतर तिरस्कारात  होत . ती त्रयस्थ बनून तिच्या वडिलांना याची माहिती देत असते .
              मंदार देवयानी यांच्यातील नाते मुलीच्या माध्यमातून समोर येत . ती जे नाटक लिहिते आहे , त्यात तिच्या आयुष्यात येणारी खरीखुरी पात्रं आहेत . नाटकात हल्ली एका प्रसंगातून दुसरा प्रसंग उलगडण्यासाठी रंगमंचाचा प्रभावी वापर करण्यात येतो . प्रकाश योजनेचा परिणाम साधत प्रसंग वास्तवदर्शी केले जातात .मुलीच्या नाटकात ठकी , गुरूचा हात पकडून तिच्या विश्वात जाण्याचा निघून जाण्याचा पर्याय निवडते .वास्तव जीवनात देवयानी सोबत राहते का     गुरु शिवायच्या  मंदार सोबत आयुष्य व्यतीत करण तिला कठीण जातंय का ? त्यातून ती काही वेगळा मार्ग अवलिंबते का ? यासाठी नाटक पहाव .

             त्रिकोण प्रकारातल हे नवीन नाटक .  त्रिकोणाच्या किती श्यक्यतांचे प्लॉट लेखकांच्या मनात घोळत असतात कोण जाणे .  त्रिकोण कथेचा बाज धक्कातंत्र , खुमासदार संवाद यावर आधारित आहे . त्यामुळे ते नाविन्यपूर्ण आणि ताज वाटत .


No comments:

Post a Comment