Tuesday, 5 April 2016

संभ्रम

             प्रेम म्हणजे फक्त शारीरीक आसक्ती असते का ? पुरुषांत एक ययाती कायम वसलेला असतो का ? निर्मळ प्रेमाची व्याख्या काय ? तिच्याशिवाय इतक अलिप्त , एकट का वाटत होत? अस्वस्थता नेमकी कसली होती ? या सर्व प्रश्नांनी तो गोंधळाला होता . स्वतःशीच चाललेल्या संवादात गुरफटला होता . ती निघून गेल्यावर , तिच्याशिवाय मात्र एक अपूर्णतेची जाणीव सतत बोचत होती . एक भयाण पोकळी अंतर्मनात साचून राहिली होती . त्याचा नेमका अर्थ उकलत नव्हता .  त्याच्या मनात  विचारांची आवर्तन भिरभिरत होती . समुद्र आणि क्षितीज एकरूप भासतात . ते एक कुठे एक  आहेत . मिलनाचा एक भास आहे . फुलांशी  खेळणारा भ्रमर , आता होता निघाला भ्रमणाला .  फुलं तरीही आपल्याच आनंदात रममाण आहेत . दोघंही आपल्या परिघात रमले  आहेत . एकमेकावर भार  न होता . सोबतीने मिळालेल्या  क्षणाचे दवबिंदू समरसून प्राशन करतायतंं, कोणताही संभ्रम मनात न आणता . जगतायतं आजचा क्षण जो शाश्वत आहे . निसर्गाकडे कधी मायेने पाहिलच  नाही ,त्याला आपुलकीने कधी गोंजारलं नाही .  त्याच्या सादाला प्रतिसाद कधी दिला नाही . हे निसर्गाचं सहज स्वरूप कधी त्याच्यात उतरलं नाही .   न सांगता , डोळ्यांनी अनेकदा तिने मन उघड केलं होतं. निसर्गाच चैतन्य , प्रेम , साद  भरभरून त्यात होतं. शब्दांच्या बुडबुड्यासवे त्याचे मन हवेत तरंगत असे  . जमिनीवर घट्ट उभं राहून या निसर्गाला कधी कवटाळले नाही . ही जाणीव त्याच्यात  खोल रुजली नाही . आता या जाणीवांच्या जगात जगण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता  . 

No comments:

Post a Comment