पार्श्वभूमी
हिवरे बाजार हे अहमदनगर जिल्ह्यातील शिवकालीन नाते असलेलं एक समृद्ध गाव . परंतु १९७२ च्या दुष्काळानंतर या गावाची स्थिती बदलली . दारू ,शिक्षणाचा अभाव यामुळे गावाला अवकळा आली . १९८९ नंतर पोपटराव पवार यांच्या नियोजनबद्ध विकास कार्यक्रमामुळे गावाचा विकास झाला असून आता हे गाव एक आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे . शाळा , ग्रंथालय , विहिरी ,झाडे यांना महत्व दिल्यामुळे जगभरातून लोक गावाचा अभ्यास करण्यासाठी येतात .
गावातील उपक्रम
• शिक्षण
• व्यसनमुक्ती
• सेंद्रिय शेती
• पाणलोट विकास
• पशुधन विकास
• महिला सक्षमीकरण
• सौर ऊर्जा
परिणाम
• पाण्याची उपलब्धता वाढली
• सुधारित पीक उत्पादन (300%)
• वाढीव उपजीविका (50% उत्पन्न वाढ)
• चांगले शिक्षण (९० टक्के उपस्थिती)
• सशक्त महिला (30% बचत गट सदस्यत्व)
• ऊर्जा खर्च कमी (80%)
प्रशासन, धोरण आणि गाव
राज्याचा विकास करताना धोरण आखणी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे . त्यानंतर अंमलबजावणीचा भाग क्षेत्रीय पातळीवर येतो . शासन धोरणाची आखणी करत असताना समन्यायिक तत्वाच्या आधारे आखणी करत असते . परंतु एका गावाचा विकास होतो आणि अन्य गावाचा नाही याचा अर्थ अंमलबजावणीतील उदासीनता हाही एक भाग दिसून येतो . सरपंचाशी झालेल्या चर्चेतून असे दिसून आले की , ग्रामीण पातळीवरील समस्यांचा अभ्यास न करता , स्थानिक लोकांची मते विचारात न घेता धोरणे आखली जातात . आता इथे प्रश्न येतो मंत्रालयीन धोरण आखणी पद्धतीचा . पूर्वी कोणतेही धोरण आखताना संबंधित विषयातील तज्ञाची समिती नेमून त्या आधारे धोरण आराखडा तयार होत असे . कोणतेही धोरण पूर्ण राज्यावर परिणाम करणारे असल्यामुळे मला धोरण आखणी करताना खालील तीन मुद्दे विचारात घ्यावे असे वाटते .
१} क्षेत्रीय तपासणी
२} तज्ञांचे मत
३} प्रशासनिक पातळीवर सर्व अंगाने चर्चा
४} धोरण आखणी
उपाययोजना
गाव पातळीवर शासनाच्या अनेक योजना आहे . अशा सर्व योजनांची एकत्रित माहिती उपलब्ध करून त्याबाबत ग्रामपातळीवर सजगता वाढविणे आवश्यक आहे . शिक्षण , सजगता , अंमलबजावणी या त्रिसूत्रीचा आधारे हे साध्य करता येईल. यातील लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.
Ajay Bhosale.
No comments:
Post a Comment